Thursday, February 28, 2019

माझे गाव


माझे गाव

माझ्या गावाची वाट
जाई नदीच्या काठोकाठ
उसळती धुळीचे लोट
रस्ता जाई  वळत वळत
रस्त्याच्या कडेला
पसरले गुलमोहर
सावली देई आल्या गेल्या
उन्हामध्ये थंडगार!
गावामध्ये एकेक घर
डोकावता मिळे आदर
मायेचा ओलावा
जाणवे अपरंपार!
माझ्या गावाचा पाणवठा
भरतसे हंडा लोटा
बारमाही भरलेला
कधी नसे त्याला तोटा!
माझ्या गावात चिंचेचा पार
बसती मंडळी वडील थोर
गावाच्या हकिकती सार
कानोकानी जाती दूरदूर!
माझ्या शाळेचे विद्यामंदिर
मुले जाती होण्या साक्षर
घडविती नवी पिढी
जीव लावून मास्तर!
गंगामाईच्या काठी
माझ्या गावाचे मुक्तिधाम
झाले गेले इथे ठेऊन
जन म्हणती रामराम!
आसा हा गांव माझा
लावितसे हुरहुर
जीव होई बेचैन
अंतरी उठते काहुर!
माझ्या गावाचा गणपत वाणी
घालतसे तुळशीची माळ
माप तोलता तोलता
गाई सावळ्याची गाणी!
गावाचे बारा बलुतेदार
आम्हा असे त्यांचा आधार
पाय शिवून त्यांचे
मानावे उपकार!
माझा हा गाव
नांदतो एकोप्याने
सुखदुःखाचा सोबती
घ्यावा विसावा विश्वासाने!

मनोज करंदीकर


माझ्या गावात


कुणी आपल्या गावात गेलाय असं समजतं तेव्हा वाटतं त्याला सांगावं 

गावच्या माझ्या हवे हवेत 
मन माझं अडकलय
श्वासात भरून  घेऊन तिला
जाणीव माझी करून दे

माझ्या घराच्या कान्या कोपऱ्यात 
बसल्या आहेत माझ्या आठवणी
गेलास तिथे तर थोड्याश्या तुझ्या
खिश्यात भरून घेऊन ये

मम्मी पप्पांच्या मिठीत माझं
विश्व समावलेलं आहे
भेटलास त्यांना तर  माझ्यासाठी
त्या प्रेमाच्या सावलीत बसून ये

कामा साठी सोडला गाव
पण अस्तित्व तिथेच रमलं आहे
मी नक्की परत येईन
ह्याची जाणीव त्याला करून ये

खूप काही बदललं असेल
खूप काही बदलत आहे
कितीही बदललं तरी पाठ फिरवणार नाही
असा विश्वास त्याला देऊन ये
असा विश्वास त्याला देऊन ये

--रुपाली मावजो किर्तनी

















देश प्रेम - NRI चे


अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा 
असे म्हणत इथे परदेशात आलो 
पण येताना मनात आणि सामानात
आपला भारत देश घेऊन आलो 
भारतीय दुकाने ,भारतीय माणसं 
भारतीय चॅनल्स ,भारतीय मंडळे 
सगळीकडे भारतीय पाळेमुळे शोधु लागलो
परधर्मी परदेशात आपली संस्कृती रुजवू  लागलो 
मुलांसाठी सारे सणवार यथासांग करू लागलो 
मराठी भाषा ,मराठी कार्यक्रम यांची त्यांना  जाण देऊ लागलो
देशातील घडामोडीनी इथे हळवे होऊ लागलो 
देशावरील हल्ल्यानी इथे त्वेषाने पेटू लागलो 
देशाच्या प्रगतीने इथे आनंदानी उचंबळू लागलो 
प्रत्यक्ष देशसेवा जरी करू शकत नसलो 
देशाच्या आर्थिक विकासात खारीचा वाटा उचलु लागलो 
इथे येताना प्रत्येक वेळी आत काहीतरी तुटत असतं 
हातातुन काहीतरी सुटल्यासारखा वाटत असतं 
असे आम्हीं शब्दशः NRI आहोत 
तिथे शरीराने न राहणारे 
इथले मनाने भारतीय आहोत 

 सौ .नम्रता नितीन देव .
                                     

















मानसी मनोज करंदीकर


मानसी मनोज करंदीकर




श्रुतिका राजन तावडे


श्रुतिका राजन तावडे