Sunday, June 9, 2019

महाराष्ट्र माझा : विशेष गोष्टी - श्री. नरेंद्र कुलकर्णी


·         महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त रस्त्यांचे जाळे आहे - एकूण अंतर २,६७,५०० किमी.
·         महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (११२,३७४,३३३ - २०११ जनगणना) असणारे जगात केवळ १० देश आहेत.
·         १८८८ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
·         संपूर्ण विश्वातील खाऱ्या पाण्याचा एकमेव तलाव महाराष्ट्रात आहे - लोणार सरोवर.
·         नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखी गडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
·         नवापूर हे रेल्वे स्टेशन एकमेव असे स्टेशन कि जे दोन राज्यात विभागले गेले आहे - महाराष्ट्र आणि गुजरात.
·         महाराष्ट्रयीन जनता आयकर (इनकम टॅक्स) भरण्यात भारतात अग्रेसर आहे.
·         मुंबई, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, वरळी आणि छोटे कुलाबा या ७ बेटांनी मुंबई बनली.
·         २६०० ( डब्बे) - ३५०० (१२ डब्बे) जणांसाठी बनवलेली मुंबई ची लोकल, गर्दीच्या वेळो ५००० च्या वर लोकांना घेऊन जाते. रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. इस्राईल ची लोकसंख्या तेवढी आहे.
·         भारतामध्ये आरमार हि संकल्पना शिवाजी महाराजांनी पुढे आणली.
·         औरंगाबाद मध्ये एकूण ५२  दरवाजे (gates) होते. आता १७ शिल्लक आहेत.
·         बॅडमिंटन चा शोध ब्रिटिशांनी पुण्यात लावला. इतके कि त्याचे नाव पूना  (POONA) होते.
·         हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म पुण्याचा आहे.
·         महाराष्ट्रात एकूण ४२ वन्य जीव अभयारण्ये आहेत.
·         महाराष्ट्रात एकूण ३५० किल्ले आहेत. जे कधीतरी युद्धनीती साठी वापरले गेले.
·         विश्वातील सर्वात मोठे नियोजित शहर नवी मुंबई आहे.
·         देशाच्या २०% औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रातून होते.

No comments:

Post a Comment