Sunday, July 7, 2019

पाऊस - सौ. नम्रता नितीन देव


ये रे ये रे पावसा म्हणता
       कधी येशील रे? म्हटलं ।
आणि बघता बघता
       मन काळजीने रे भरलं ।
पाणी टंचाईने साऱ्यांचे
       डोळे पाण्याने भरले ।
बळीराजाचे आशेने
       डोळे आभाळा लागले ।
साऱ्या सृष्टीच्या हाकेला
       मग आभाळ धावले ।
झिम्माड होऊन मग ते
       शतधारांनी बरसले  ।
साऱ्या उशिराची कसर
       त्याने भरून काढली ।
तृषार्त धरणीला
       त्याने चिंब चिंब केली ।
असा तिथे गावाकडे
       पाऊस बेधुंद बरसणारा ।
येथे मात्र सूर्य जणू
       आग ओकणारा ।
तिथल्या पावसाने
       मन येथे चिंब होते ।
कागदी होडीत बसून
       बालपणाला भेटते ।    

No comments:

Post a Comment