Wednesday, November 18, 2020

दिवाळी-------सौ. अंजली निलेश उज्जैनकर

 

दिवाळी

आली आली दिवाळी, सुरू करा तयारी

खरेदीला येते उधान, फटाक्यांची तर मज्जाच भारी,
घरादाराची करावी साफसफाई, किल्ला बांधावा रायगडापरी.

आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण करूनी,
मांगल्याचे प्रतीक म्हणून बांधावे दारी.

सारवलेल्या अंगणात, इंद्रधनुच्या रंगांची काढा रांगोळी,
जीवनातही असेच रंग भरो हीच प्रार्थना देवाजवळी.

आसमंत प्रकाशमय करणारा कंदील लावा आभाळी,
कर्तुत्वाचा चमकावा तारा कंदिलाच्या प्रकाशातूनी.

दिवसाची सुरुवात करा उटणे लावून अभ्यंगस्नानानी,
मनातील भेद भाव धुवून निघावा या स्नानातुनी.

आरती ओवाळून तोंड गोड करा तिळाच्या वडीनी,
शब्दांतील गोडवा टिकवावा असेच गोड बोलूनी.

मातीच्या पणतीत लावून दिवा उजळून टाका घरदार,
गरिबांच्या कारागरीला करून सलामखरेदी करून द्यावा त्यांना आधार .

गोड आणि खमंग फराळ करून परंपरेचा वारसा चालवावा,
सणासुदीच्या निमित्ताने एकत्र भेटून  नात्यातील गोडवा असाच बहरत रहावा.

पाच दिवसांची दिवाळी करावी आनंदाने साजरी,
थोरामोठ्यांचे आशिर्वाद असावे सतत आपल्यावरी.

आली आली दिवाळी करा जल्लोषाने साजरी..


सौ. अंजली निलेश उज्जैनकर

No comments:

Post a Comment